Posts

Showing posts from 2018

अतुट नात ते..........

Image
अतूट नात ते, सुंदर प्रेमाच नात ते, कधीही हक्काने ओळख करून देणारे नात ते,, अहो अस नात तरी कोणत असाव भाऊ बहीण ते... भावाच निरागस प्रेम अणि बहिणीची माया हे सर्वाच्या भाग्यदायी नसत . नाजुकशी, फुलसुंदर , भोळी भाबडी, हक्काने अरे दादा हाक मारणारी बहीण ..ही माझी लाडकी बहीण अशी ओळख करून देणारा भाऊ प्रत्येकाचाच नशिबात असतो असे नाही. बहिणीच्या सदैव पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, अडचणीत नेहमी सगळ्याच्या आधी मदतीसाठी पुढे असणारा, दुसर्‍या कोणी बहिणीला छेडले तर “माझ्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघायच नाही ”अशी धमकी देणारा,,वडीलांच्या नंतर घरासाठी एक पुरुष म्हणून सोबत असणारा.. म्हणजे भाऊ ... म्हणतात ना वडीलानंतर घरातला जबाबदार पुरूष म्हणजे मुलगा... पण आता बहीण आणि भावाच्या नात्यातील वागणूकीबदल बोलायच झाल तर तो त्या त्या कुटूंबाच्या विचार करण्यावर आहे.      आताच्या काळात मुलगा ऩमुलगी असा फरक फारसा दिसून येत नाही पण कुटूंबाच्या विचारांवर मात्र काहीसा फरक दिसून येतो. मुलगा म्हणजे घरचा दिवा किंवा घरचा खरा वारस अशी समज असणाऱ्या कुटुंब...

मी मराठी भाषा बोलतेय.....!

“मी मराठी भाषा बोलतेय!  अवघ्या महाराष्ट्राची मायबोली. देववाणी -संस्कृत भाषा ही माझी महामाय. संस्कृतातून प्राकृत निर्माण झाली आणि प्राकृतातून मी अवतरले. पण हे परिवर्तन काही आजचे नाही. त्याचप्रमाणे ते एका दिवसात झालेले नाही. वर्षानुवर्षे हे परिवर्तन चालू होते. सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले... मला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. माझा भांडार सम्रूद्ध झाले. आज सातशे वर्षेात मला माझ्या सारस्वतांनी खूप घडवले त्यात कधीही खंड पडली नाही. माझ्या शुद्धतेविषयी सांगायचे झाले तर अगदी शिवाजी राजांनीही स्वराज्य स्थापनेनंतर पहिले काम काय केले असतील तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करवून घेतला.. माझे मूळ ज्या गीर्वाण-वाणीत आहे तिचा खजिना तर माझ्यासाठी खुला असतो. १९६० साली माझे स्वतंत्र राज्य झाले.. मी राज्यभाषा झाले.... पण आता आजकाल अनेकदा माझ्या भविष्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते.. मराठी भाषेचे भवितव्य काय? कारण मोठ मोठ्या शहरांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. बहुसंख्य महाराष्ट्रीय मंडळी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.. का?? तर इंग्रजी भाषेवर प्रभुत...

शब्द नसते तर....

शब्द  शब्द शब्द... आणि  शब्द..!“ शब्द हे आमुचे धन शब्द हेच आमुचे दैवत ”हेच शब्द आपल्यावर रूसले तर....! सततच्या या व्यवहारात वेगवेगळ्या भाषेतले शब्द कानावर येतात. सगळ्याच शब्दांचा अर्थबोध  होतोच असे नाही. कुणाचे शब्द हे मनावर मोरपीस फिरवल्या सारखे सुखद वाटतात तर कुणाचे शब्द कट्यार काळजात घुसावी असे जिव्हारी लागतात .काही भावना शब्दात साकार होतात.. तर काही भावना शब्दांच्या पलीकडे असतात. शब्द म्हणे हे दुधारी शस्त्र आहे कटू शब्दांनी  अनेकदा इतरांची मने दुखावली देखील जातात. शस्त्रांनी झालेली जखम भरून निघते.पण शब्दांची जखम अनेकदा माणसामाणसात कायमचे वैर निर्माण करते.. काही वेळा असेच वाटे नकोच हे शब्द.. चांगल्या शब्दांनी माणसे जवळ येतात.. पण त्यांच चांगल्या शब्दात आपल्या भावना मांडल्या तर भावना मांडणे पण गुन्हा वाटतो.. ज्या शब्दांचा आधार घेऊन आपले विचार ,आपले म्हणे, आपल्या ईच्छा मांडतो त्यांच शब्दांचा वेगळा अर्थ काढून माणसे दुरावली जातात. शब्द म्हणजे फक्त एखाद्या वर टिका करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र आहे का..? शब्द ही माणसाची फार मोठी शक्ती  आहे फार मोठी निर्मित...