Posts

थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील...

Image
छावा… छावा चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच छावा चित्रपट Controversy च्या भोवऱ्यात अडकला होता. सध्या Controversy ही एक फॅशनं झालीय. असो आपल्याला Controversy बद्दल काही जास्त बोलायचं नाहीय.  Controversay ला बळी पडून कोणत्याही चित्रपटाला नाव ठेवण्यापेक्षा एखादा चित्रपट स्वतः चित्रपटगृहात जाऊन पाहणे आणि त्या चित्रपटाचा स्वतः अनुभव घेणे जास्त महत्वाचं वाटत मला...   हा माझा अनुभव आणि माझं मत इकडे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय.. आता पर्यंत बरेच ऐताहसिक चित्रपट आपण पाहत आलोय. पण जेव्हा छावा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला तेव्हा तो चित्रपटगृहातच जाऊन बघण्यासाठी मी उत्सुक होते..  छावा चित्रपट बघताना छत्रपती संभाजी महाराजच आपल्यासमोर आहेत यावर विश्वास बसावा इतपत अभिनेता विकी कौशलने ही भूमिका जगली आहे. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदन्ना ने देखील अगदी उत्तमरीत्या महाराणी येसुबाईची भूमिका साकारली आहे.   बुरहान मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची होणारी एंट्री पाहताना तसेच राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी आपल्या आबासाहेबांना आठवून सिंहासनावर बसतानाचा सिन  ब...

पहिल्या पावसाची रिमझिम....

Image
पाऊस...... पाऊस या शब्दातचं खरतर थंडावा आहे.  जास्ती जास्त जणांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा... दरवर्षी जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याच्या पहिल्या सरीत हव्याश्या गारठ्यात खुप जुन्या आठवणी तो जाग करतो. धावपळीच्या जगात आयुष्य कसं यंत्र बनलेलं असतं. रोजचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरतचं असत.  रोज सकाळी उठा, नाश्ता करा, उन्हाचे चटके खात कधी एकदा ऑफीसच्या ए. सीत जाऊन बसतोय असं होतं.  उकाड्याने हैराण  झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी पडतोय? हाच प्रश्न सारखा सतावतो.   अचानक चटके देणाऱ्या रखरखत्या उन्हात आभाळ भरतं, वारा भणाणतो , थंडगार वाऱ्याच्या झुळूकाने अंग शहारतं आणि  दिवसभराचा तो आळस कुठल्या कुठे गायब होतो,  आणि उन्हामुळे त्रासलेला प्रत्येकजण निश्वास सोडतो.      पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद सगळेजण घेतात.  पावसाच्या त्या पहिल्या सरीत भिजताना शाळेतील -कॉलेजातील दिवसांमध्ये आपण  पुन्हा खेचले जातो आणि जुन्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या होतात.           पाऊस म्हटलं की,  ...

ट्रेंड वेबसिरीजचा....

Image
ब्लॉग्स ,फेसबुक ,ट्विटर, युट्युब ,इंस्टाग्राम आता हे नवीन विश्व म्हणजे सोशल मीडियाचं  व्हर्च्युअल विश्व आहे . सोशल मीडिया म्हणजे आता सगळ्याच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. युट्युब आणि त्यावरील विविध वेबसिरीज यावर तरुणाईचा कल जास्त आहे. वेबसिरीजचा आजची तरुणपिढी अधिक पटीने वापर करताना दिसत आहे. चित्रपट आणि मालिकांचे वेड हे सगळ्या जगात सारखेचं  आहे. त्यात नाव कमवावं आणि मोठं कलाकार व्हावं म्हणून  कित्येक कलाकार मुंबई गाठतात.   छोट्या पडद्यावर   झळकण्याचा त्यांच्या अपेक्षा असतात. मोठ- मोठ्या साहित्य लेखनानंतर ती गोष्ट दाखवा ,ती पटली तर निर्मितीच्या प्रक्रियेला सुरवात करा. अशा लांबलचक प्रक्रियेतून न जाता आपल्याला जे विषय आवडतात ते विषय तरुणांनी  वेबसीरिजच्या माध्यमातून मांडायला सुरवात केलीय. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन  व्यासपीठावर वेबसिरीज हे हॉट आणि हिट माध्यम समजले जाते. चित्रपट , मालिका आपण बघतच असतो. पण मालिकांप्रमाणे सासु सुनेचं कंटाळवाणे रडगाणे हे वेबसिरीज मध्ये नसते. छोट्या आणि नेमक्या मांडणीतून कधी स...

जागतिक रंगभूमी दिन.

Image
२७ मार्च...!  २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात. रंगभूमी म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे फक्त वेगवेगळी पात्र त्या पात्रातून सादर केलेले नाटक असा समज असतो.  १९६१ मध्ये “युनेस्को” च्या इंटरनॅशनल इस्टिट्यूने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये झाला.  विष्णूदास भावे यांच्या “सीता स्वयंर” या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरूवात झाली.  त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली.  त्यातील एक महत्वाचे वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा एक वेगळाच सुवर्णकाळ होता. नाटक हे मराठी माणसाचे पहिले वेड असे म्हणण्यात काही हरकत नाही. चार मराठी माणसे एकत्र आली तर एखादे नाटक सादर झालेच पाहिजे. पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतार खेळ ही मुख्य मनोरंजनाचा भाग झाली. “नाटक” या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.   संगीत नाटकांनी परंपरा मागे पडल्यानंतर सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय अशा नाटकांनीही काही काळ गाजविला. नाटक ...

कवितेचा नवा डिजिटल प्रवास

साहित्य क्षेत्रात कविता हा एक महत्त्वाचा विषय आहे.पण या एकविसाव्या शतकात साहित्य क्षेत्राची ओढ कमी होतेय.संगणक,इंटरनेट यांच्या जमान्यात माणसे ग्रंथालयात जाण्याचे ट...

कविता कॅफे

Image
कविता....! काय असते कविता? कविता कशी करतात माहित नाही? नक्की कवितेमध्ये काय मांडायच माहित नाही? पण एखादी कविता वाचताना किंवा ऐकल्यावर एक अनोखा आंनद मिळतो जणू काही ती कविता आपल्यावरच लिहिली आहे अस वाटत... म्हणजे मला तरी असच वाटत.. एखाद्या कवीची कविता वाचल्यावर अरे ही कविता आपण पण करू असा सहज विचार डोक्यात येतो.. कविता म्हणजे आपल्या अंर्तमनात अनेक गोष्टींची,घटनांची व त्यांचा आपण लावलेल्या अर्थाची नोंद असावी. बहुदा कविता तेथूनच जन्माला येत असावी. आपण काय पाहतो? आपण कसे जगतो ? यांचा साधारण परिपाक असावा असे मला वाटते. रात्र आणि कविता याचा घनिष्ट संबंध असावा कारण रात्रीचा एकांतात कविता अजुन छान सुचते अस म्हणतात. कविता जी एकांतात बसून सुचते कविता जी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून सुचते कविता जी किनार्‍याला मिठी मारणाऱ्या लाटांना बघून सुचते कविता जी हिरव्यागार झाडांना बघून सुचते कविता जी उंच डोंगर रांगांकडे बघून सुचते कविता जी पावसाच्या सरीत भिजताना सुचते कविता जी पांढर्‍या शुभ्र कोसळणार्‍या धबधबाकडे बघून सुचते कविता जी उगवत्या सूर्याला बघून सुचते कविता जी निळ्याशार शांत पाण्याकडे ब...

मी बेस्ट बस...

Image
  आठ दिवस झाले ह्या घरात राहून कंटाळा आलाय..घर कोणत अहो हा डेपो हो माझा... समजल आता मी कोण ते... रोज ईकडे -तिकडे फिरायची, रोज त्या टींग टींग बेलच्या आवाजाची, जोर जोरात वाजणाऱ्या हॉर्नची,छोट्या छोट्या कारणावरून भांडण करणाऱ्यांची भांडण  ऐकायची सवय झाली हो...! याच लोकांच्या गर्दीच ओझ झेलणारी मी आठ दिवस झाले एकाच ठिकाणी उभी आहे. सगळ्याची लाईन लाईन ना मी अजून किती दिवस मला अस उभ राहाव लागणार ..   आपली मुंबई गर्दीची, कष्टकरांची, कामगांराची उजडल्यापासून मावळेपर्यंत गाणे गाणारी.. झोपडी, चाळ, साध्या वसाहतीत राहणारा कामगार संपवण्याचा विडा आता आपल्यातील काही दलालांनी उचलला आहे. काही वर्षांपूर्वी या सोन्याचा मुंबईत मिलचे भोंगे वाजायचे.त्यामध्ये काम करणारा कामगार हा मराठीच होता. जमाना बदला, परिस्थिती बदलली तस राजकारण बदललं, वाटाघटीचे राजकारण सुरू झालं आणि गिरण्या बंद पडल्या, तो गिरणी कामगार हताश झाला, आंदोलनात उतरू लागला,पडद्या मागे वाटाघाटी सुरू झाल्या अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणुस मेला...! हो मी बरोबर बोलतेय.. कोणी मुंबई बाहेर गेल तर कोणी गावचा रस्ता पकडला. आता माझ्य...